Sanjay Raut Slams Government Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur : ...हे सरकार हिंदुत्वद्रोही! नामांतराच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर संजय राऊत कडाडले

मंगेश मोहिते

नागपूर: महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय घेतले होते. या बैठकीत नामांतराचा निर्णयही घेण्यात आला होता. आता राज्यात नव्याने स्थापन झालेले शिंदे-फडणवीस (Ekanath Shinde) सरकार या निर्णयाला स्थगिती दिली आहे. ठाकरे सरकारनं अखेरच्या क्षणी नियमबाह्यपणे हे निर्णय घेतले असून ते स्थगिती करुन नव्यानं निर्णय घेतले जाणार असल्याचं सांगितलं आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. (Sanjay Raut Latest News)

हे देखील पाहा -

संजय राऊत सध्या नागपूरात आहे. नागपूरमधील वर्धा रोड येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये राऊत यांची शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्याशी हॉटेलच्या लॉबी मध्ये भेट झाली. या भेटीनंतर शरद पवार हॉटेलमध्ये तर संजय राऊत बैठकीसाठी रवाना झाले, त्यापुर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, "ठाकरे सरकारने औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील यांचे नाव दिले, हे निर्णय नव्या सरकारने रद्द केले, हे खरं असेल तर हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहे हे सिद्ध झालंय" अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते म्हणाले की, औरंगाबादचं संभाजीनगर कधी करता यासाठी भाजप विचारत होते. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिकेतून हे निर्णय घेतले होते, या निर्णयाला स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाही असं संजय राऊत म्हणाले. मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांना निर्णय फिरवण्याचा अधिकार नाही. हे निर्णय बदलून काय साध्य केलं? हे फडणवीस यांना विचारायला हवं, मुख्यमंत्र्यांना विचारा म्हणणार नाही. कारण त्यांच्या हातात काहीही नाही. एकाबाजूला तुम्ही शिवसेनेनं हिंदुत्त्व सोडलं असा आक्रोश करता, तर दुसऱ्या बाजूला हे निर्णय बदलता असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

औरंगजेब तुमचा नातेवाईक झालाय?

खरतंर स्थगितीबाबत फडणवीसांना विचारायला हवं कारण शिंदेंच्या हातात काहीच नाही. औरंगजेब नातेवाईक तुमचा कधीपासून झाला असा सवाल राऊतांनी यावेळी केला. औरंगजेब हा कोण लागतो, हा उस्मान कोण लागतो त्यांच्या नामांतराला स्थगिती का देता? असे प्रश्न राऊतांनी यावेली केले. दी. बा. पाटीलांच्या निर्णयला त्यांनीदेखील पाठिंबा दिला होता. मग आता स्थगिती. मला वाटतं हे सरकार गोंधळलेलं आहे.

खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत

"संसदेत यापुढे काहीहीच करता येणार नाही. हात, पाय बांधून तोंडावर चिकटपट्ट्या बांधून आम्हाला जावं लागणार आहे. या देशात आणिबाणीपेक्षा जास्त भयानक स्थिती आहे. सरकारने आणीबाणीत सहभागी असलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय कशाला घेतला आहे. आम्ही आणिबाणीविरोधात लढत आहोत, त्यामुळे सर्व महाराष्ट्राला पेन्शन द्यावी लागेल," असं संजय राऊत म्हणाले. "चिठ्या देतात, माईक खेचतात, शर्ट खेचतात अशा बऱ्याच गमती-जमती राज्यात पहायला मिळत आहेत. यावर मी काय बोलणार? खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत" असा टोला संजय राऊतांनी लगावला. आशिष देशमुख यांची स्वतंत्र विदर्भाची जुनी भुमिका आहे, पण काँग्रेस आमच्यासोबत आहे असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT