Sanjay Raut News Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News : राज्यात दंगली घडवून निवडणुका घेण्याचा कट; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

Sanjay Raut News : राज्यात दंगली घडवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. दंगली घडवून निवडणूका घेण्याचा हा कट आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Satish Daud

Sanjay Raut News : राज्यात दंगली घडवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. दंगली घडवून निवडणूका घेण्याचा हा कट आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर माहीम येथील मजारीवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर राज्यभरात अनाधिकृत मस्जिद दर्ग्यांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यामुळे राज्यात दंगली घडवण्याचा हा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.  (Breaking Marathi News)

ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवर हा गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचं दंगली घडवायच्या आणि मग निवडणुकांना सामोरं जायचं, अशी एक पडद्यामागची पटकथा लिहली जात आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला.

'ज्याप्रकारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आणि महाविकासआघाडीला लोकांचा पाठिंबा मिळतो आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासोबत असलेले बगलबच्चे हादरलेले आहेत. आमच्यासाठी सामना करण्यासाठी ते जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. या राज्यात आणि देशात सामाजिक तेढ निर्माण करून, निवडणुकांना सामोरं जायचं, असा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे', असंही संजय राऊत म्हणाले.

'मनसेच्या मेळाव्यात मनसे नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकर म्हणाले होते की, “राज ठाकरेंनी संजय राऊतांना मोठं केलं, पण तो त्यांचाही नाही झाला, तो तुमचा काय होणार. या संजय राऊतांनी स्वतः कबुली दिलेली की, मी शरद पवार यांचा माणूस आहे. आता त्यांनी स्वतःल पवारसाहेबांचा माणूस म्हटलंय म्हणजे पुढे काय होणार ते तुम्हाला माहितीच आहे', असा टोला संजय राऊतांनी लगावला.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांवर शिंदे-फडणवीस सरकारमधील शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यात कुठेही दंगल झालेली नाही. संजय राऊत यांना विशिष्ट समाजाची मत हवीत म्हणून ते असं वक्तव्य करत आहेत. ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वचा मुद्दा पुढे केला तो मुदा यांनी सोडलाय. आजच संजय राऊत यांचं स्टेटमेंट वाचा आणि जनतेने विचार करा. मतांसाठी बाळासाहेबांनी असं काहीही केलं नाही, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती होणार

Maharashtra Politics: पंढरपुरमध्ये CM फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक, ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर

क्रिकेट खेळताना भयंकर घडलं, पोटाला बॅट लागली अन् जागीच कोसळला, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Crime News: ५ कोटींची रोख रक्कम, दीड किलो सोनं, आलिशान कार अन्... पोलिस अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

Akshay Kumar: डीपफेक व्हिडीओ प्रकरणात अक्षय कुमारला दिलासा; हायकोर्टाने दिले महत्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT