Manoj Jarange  Saam Digital
महाराष्ट्र

Vishal Patil: मनोज जरांगेंना सरकारने त्रास दिला,पण मराठ्यांनी लोकसभेत बदला घेतला; काँग्रेस खासदाराचं मोठं विधान

Vishal Patil Sangli Politics: सरकारने मनोज जरांगेना त्रास दिल्याचा बदला मराठा समाजाने लोकसभेत घेतला. आणि मी खासदार झालो, असं विधान विशाल पाटील यांनी केले आहे. विशाल पाटील यांच्या या विधानामुळे मराठा-ओबीसी वाद विकोपाला जाईल,अशी शक्यता आहे.

Bharat Jadhav

मराठा समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना जो त्रास फडणवीस आणि सरकारने दिला. त्या त्रासाचा बदला समाजाने लोकसभा निवडणुकीत घेतला. त्याचमुळे मी खासदार झालो, असे वक्तव्य खासदार आणि काँग्रेस काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांनी केले. ते मिरजेमध्ये एका सत्कार समारंभात बोलत होते.

तसेच पुढील विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात चार ते पाच काँग्रेसचे आमदार निवडून येतील. असा दावा विशाल पाटील केला आहे. तसेच वसंतदांताच्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा आणि विश्वजीत कदम हेच मुख्यमंत्री होणार असेही विशाल पाटील यांनी बोलून दाखवलं.राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलाय. मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ओबीसी नेत्यांना पराभूत करण्यासाठी बैठका घेतल्याचा आरोप ओबीसी नेत्यांकडून केला जात आहे.

त्याचदरम्यान विशाल पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे मराठा ओबीसी वाद अजून विकोपाला जाणार असल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फटका भाजपला बसल्याचं दिसलं. बीडमध्ये पंकजा मुडें यांचा पराभवही त्याच कारणामुळे झाला. निवडणुकीच्या अखेरच्या दिवसांमध्ये मराठा-वंजारा असा वाद सुरू झाला होता. त्याचा परिणाम पंकजा मुंडेंना बसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT