Manoj Jarange  Saam Digital
महाराष्ट्र

Vishal Patil: मनोज जरांगेंना सरकारने त्रास दिला,पण मराठ्यांनी लोकसभेत बदला घेतला; काँग्रेस खासदाराचं मोठं विधान

Bharat Jadhav

मराठा समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना जो त्रास फडणवीस आणि सरकारने दिला. त्या त्रासाचा बदला समाजाने लोकसभा निवडणुकीत घेतला. त्याचमुळे मी खासदार झालो, असे वक्तव्य खासदार आणि काँग्रेस काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांनी केले. ते मिरजेमध्ये एका सत्कार समारंभात बोलत होते.

तसेच पुढील विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात चार ते पाच काँग्रेसचे आमदार निवडून येतील. असा दावा विशाल पाटील केला आहे. तसेच वसंतदांताच्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा आणि विश्वजीत कदम हेच मुख्यमंत्री होणार असेही विशाल पाटील यांनी बोलून दाखवलं.राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलाय. मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ओबीसी नेत्यांना पराभूत करण्यासाठी बैठका घेतल्याचा आरोप ओबीसी नेत्यांकडून केला जात आहे.

त्याचदरम्यान विशाल पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे मराठा ओबीसी वाद अजून विकोपाला जाणार असल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फटका भाजपला बसल्याचं दिसलं. बीडमध्ये पंकजा मुडें यांचा पराभवही त्याच कारणामुळे झाला. निवडणुकीच्या अखेरच्या दिवसांमध्ये मराठा-वंजारा असा वाद सुरू झाला होता. त्याचा परिणाम पंकजा मुंडेंना बसला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT