MP Vishal Patil Saam tv
महाराष्ट्र

MP Vishal Patil : अलमट्टीमुळे पूर येत नसल्याचे सरकारने मान्य करावे; खासदार विशाल पाटील यांचा राज्य सरकारवर निशाणा

Sangli News : अलमट्टी धरणाची उंची सध्याच्या ५१९ मीटरवरून ५२४ मीटर करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून केंद्र सरकारकडे वारंवार मागणी केली जात आहे. याला विरोध केला जात आहे

विजय पाटील

सांगली : अलमट्टीमुळे पूर येत नसेल, तर राज्य सरकारने महापुराला आपण जबाबदार असल्याचे मान्य करावे. पुरावे माझ्याकडे द्यावेत मी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारशी चर्चा करायला तयार असल्याचे मत व्यक्त करत खासदार विशाल पाटील यांनी सरकारला एकप्रकारे आवाहन केले आहे. 

अलमट्टी धरणाची उंची सध्याच्या ५१९ मीटरवरून ५२४ मीटर करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून केंद्र सरकारकडे वारंवार मागणी केली जात आहे. याला विरोध केला जात आहे. मात्र महाराष्ट्र शासनाकडून ठोस कायदेशीर पावले उचलली जात नाही. यावर खासदार विशाल पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्य सरकारची तक्रारच नाही 

अलमट्टीबाबत राज्य सरकार किंवा तत्सम कोणत्याही विभागाकडून तक्रार किंवा उंचीबाबत आक्षेप नोंदवले नाही. त्यामुळे अलमट्टीमुळे महापूर येतो, असे राज्य सरकारचे मत नसावे अशी टिप्पणी ही खासदार विशाल पाटील यांनी केली. महाराष्ट्र सरकारची तक्रारच नसल्यामुळे कर्नाटक सरकारकडून अलमट्टी उंचीबाबत वक्तव्य केली जात असून याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. असा आरोपही खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. 

तर केंद्र व कर्नाटक सरकारसोबत चर्चा करायला तयार 

कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. दरम्यान अलमट्टी धरणामुळेच महापूर येत नसेल; असं जर राज्य सरकारचे मत आहे. तर याबाबतचे पुरावे माझ्याकडे द्यावेत. मी स्वतः केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारशी चर्चा करायला तयार आहे, असे मतही विशाल पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

SCROLL FOR NEXT