Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Sangli News: साखर कारखान्याचे केमिकल मिश्रित पाणी सोडल्याने मासे मृत्युमुखी

साखर कारखान्याचे केमिकल मिश्रित पाणी सोडल्याने मासे मृत्युमुखी

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नवेखेड सिमेवर असलेल्या फरशी ओढामध्ये साखर कारखान्याकडुन (Sugar Factory) केमिकल मिश्रणीत पाणी पाईपलाईनद्वारे सोडले जात आहे. यामुळे (Sangli News) ओढ्यातील हजारो मासे, जलचर प्राणी मृत्यू पडत आहेत. शिवाय दुर्गंधी देखील पसरली आहे. (Breaking Marathi News)

वाळवा तालुक्‍यातील नामांकित साखर कारखान्याचे केमिकल व मळी मिश्रित पाणी नागठाणे या ओढ्यातून हे केमिकल व मळी मिश्रित पाणी सोडत होते. पण नागठाणे गावातील लोकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर हे केमिकल व मळी मिश्रण पाणी नवेखेड ओढ्यात पाईपलाईनद्वारे व ट्रँकरने सोडले जात आहे. यामुळे हजारो मासे, जलचर प्राणी मृत पडलेले आहेत. यांच्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

काही करखान्‍यांकडून केमिकल व मळी मिश्रित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मासे मृत्युमुखी पडत आहेत. त्याचबरोबर जमीन ही नापीक होणार आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि गावकऱ्यांनी केला आहे. लवकरात लवकर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayaji Shinde : झाडं आमचे आई-बाप, त्यांच्यावर हल्ला झाल्यास गप्प बसणार नाही; सयाजी शिंदेंने संतापले

महिला शिक्षकाची वाट अडवली; दोघांनी मिळून कपाळावर गोळी झाडली, भरदिवसा रक्तरंजित थरार

Nitesh Rane: तपोवनातल्या वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का? राणेंचा सवाल, शिरसट म्हणाले...

मुंबई-गोवा महामार्गाचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार? नव्या डेडलाइनची घोषणा

Paneer Roll: मुलांच्या डब्यासाठी बनवा पौष्टिक पनीर रोल; सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT