Sangli News Saam tv
महाराष्ट्र

Mahayuti Goverment : सांगली जिल्ह्याला मंत्रीपद डावलल्याने महायुती सरकार विरोधात नाराजी; विरोधी पक्षाकडून आमदारांच्या राजीनाम्याची मागणी

Sangli News : फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील नागरिक व राजकीय पक्षांमध्ये नाराजीचा सूर सांगली जिल्ह्यात यापूर्वी सुरेश खाडे हे एकमेव मंत्री होते. मात्र खाडे यांनाही डावलण्यात आले आहे

विजय पाटील

सांगली : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्री मंडळ विस्तार करत ३९ जणांना मंत्री पदाची शपथ देण्यात आली. दरम्यान एकेकाळी सांगली जिल्ह्यात पाच- पाच मंत्री होते. मात्र कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यात एकही मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे संतप्त सांगलीकरांकडून महायुती सरकार विरोधी उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. तर विरोधी पक्षाकडून महायुती आमदारांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. मंत्रीपद नसल्याने सांगली जिल्हा पुन्हा एकदा राजकीय विकासापासून वंचित राहणार आहे.

सांगली जिल्हा राजकीय दृष्ट्या बलाढ्य जिल्हा आहे. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री असताना सांगली जिल्ह्यात बसून राज्याची मंत्रिपदे वाटली होती. त्याच सांगली जिल्ह्यावर आता मंत्री द्या..मंत्री द्या म्हणण्याची वेळ आली आहे. सांगली जिल्ह्यात महायुतीचे पाच आमदार आहेत. त्यामुळे किमान दोन तरी मंत्रीपदे सांगली जिल्ह्याला मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्याला आता मंत्रीमंत्री म्हणण्याची वेळ आली आहे. 

तिन आमदार होते दावेदार 

फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिक व राजकीय पक्षांमध्ये नाराजीचा सूर आहे. सांगली जिल्ह्यात यापूर्वी सुरेश खाडे हे एकमेव मंत्री होते. मात्र सुरेश खाडे यांनाही डावलण्यात आले आहे. सांगली जिल्ह्याला सुरेश खाडे यांच्यासोबत गोपीचंद पडळकर आणि सुहास बाबर यांच्या रूपाने मंत्री मिळतील अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी जिल्ह्याच्या मंत्रिपदाला महायुतीकडून हुलकावणी देण्यात आली. त्यामुळे आता महायुती सरकार विरोधकांच्या टिकेच लक्ष बनले आहे. 

महायुतीच्या आमदारांनी राजीनामे द्या 

दरम्यान देवेंद्र फडणवीस हे नेहमीच सांगलीवर सूड उगवतात, ते या विस्तारावरून स्पष्ट झाले; असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर सांगली जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांनी राजीनामे द्यावेत; अशी मागणीही विरोधी पक्षांकडून केली जात आहे. तर सांगली जिल्ह्याला हक्काचा मंत्रीच नसल्याने जिल्हा पुन्हा विकासापासून वंचित राहील, अशी शक्यता सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. 

भाजप, राष्ट्रवादी आमदारांना अजूनही अपेक्षा 
दरम्यान, याबाबत सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादीकडून मात्र अजूनही सांगली जिल्ह्याला मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे. तसेच पुढील मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीला नक्कीच स्थान मिळेल; असा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. तर जिल्ह्यातील आमदार काम करायला सक्षम आहेत. मंत्री हवाच कशाला अशी प्रतिक्रिया भाजप आणि राष्ट्रवादीकडून दिली जात आहे. मंत्रीपद दिलं नसल्यामुळे थोडीशी नाराजी असली तरी पुढील विस्तारात सांगली जिल्ह्याला मंत्रीपद मिळेल अशी भाजपा राष्ट्रवादीला अपेक्षा आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर सांगली जिल्ह्याची झालेली निराशा पाहता सांगली जिल्हा पुन्हा एकदा राजकीय वनवासात गेल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्याला हक्काचा मंत्री असेल तर कधीही कोणत्याही क्षणी आपण काम घेऊन जाऊ शकतो. मात्र आता जिल्ह्याला उसना पालकमंत्री मिळणार आणि त्या पालकमंत्र्यांच्या वेळेनुसार जिल्ह्यातील काम होणार. त्यामुळे अशा गतीने सांगली जिल्ह्याचा विकास कसा साधणार असा प्रश्न आता सांगलीकर जनतेसमोर पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT