Samruddhi Mahamarg Accident  saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident Report: समृद्धी महामार्ग बनला मृत्यूमार्ग! 100 दिवसात झाले 900 अपघात

Mumbai-Nagpur Expressway: राज्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी हा मार्ग बनवण्यात आला खरा मात्र आता तो मृत्यूचा मार्ग बनला आहे.

Chandrakant Jagtap

>>संजय डाफ, नागपूर

Accidents On Samruddhi Mahamarg: मुंबई ते नागपूर प्रवासातील अंतर कमी करण्यासाठी तसेच मराठवाडा-विदर्भच्या विकासालाही चालना मिळावी यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र आता हाच समृद्धी महामार्ग मृत्यू मार्ग बनला की काय असे चित्र निर्माण झाले आहे. कारण गेल्या 100 दिवसांत य महामार्गावर तब्बल 900 अपघात झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Expressway) सुरु झाल्यापासून शंभर दिवसात या मार्गावर नऊशे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये आतापर्यंत 31 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अजूनही या मार्गावरील अपघातांची मालिका सुरुच आहे.

समृद्धी महामार्गावर वाहन चालकांचं वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात होत असल्याचे बोलले जात आहे. राज्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी हा मार्ग बनवण्यात आला खरा मात्र आता तो मृत्यूचा मार्ग बनला आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. (Latest Marthi News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा आणि विदर्भ मुंबईशी जोडण्याच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाची संकल्पना आणली होती. या मार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवासातील अंतर कमी होण्यासह मराठवाडा आणि विदर्भच्या विकासालाही चालना मिळेल असा या महामार्गाचा उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT