Samruddhi Mahamarg Accident Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: आम्ही आरडाओरड करत होतो, पण कुणीही थांबत नव्हतं; प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग

Bus Accident News: कुणीच मदतीसाठी पुढे आलं नाही, हे धक्कादायक वास्तव प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय.

साम टिव्ही ब्युरो

Samruddhi Mahamarg: बुलढाण्यात झालेला अपघात जितका भीषण होता त्याही पेक्षा भयंकर भीषण वास्तव अपघातग्रस्तांनी सांगितलंय. समृद्धी महामार्गावर रात्री बस उलटली. तिचा ब्लास्ट झाला. २६ जण ठार झाले. पण अपघातातून वाचलेल्या प्रवाशांनी सांगितलेला अनुभव काळजाचा थरकाप उडवणारा आहे. कुणीच मदतीसाठी पुढे आलं नाही, हे धक्कादायक वास्तव प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. (Latest Accident News)

समृद्धी महामार्गाच्या अपघातातून ७ प्रवासी अगदी थोडक्यात वाचले. या प्रवाशांनी धक्कादायक खुलासे केलेत. विदर्भ ट्रॅव्हल्स या बसचा अपघात झाल्यानंतर काही प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडल्या. कसेबसे बसमधून बाहेर पडले. पण सगळेच प्रवासी या प्रवाशांइतके नशीबवान नव्हते. प्रवासी खिडकी तोडून बाहेर पडले आणि इतक्यात बसचा स्फोट झाला.

वाचलेले प्रवासी येणाऱ्या जाणाऱ्या गाडीतील लोकांना थांबवत होतं. त्याच्याकडे मदतीसाठी याचना करत होते. कुणीतरी मदत करेल या केविलवाण्या अपेक्षेने ते मदत मागत राहिले. पण एकही गाडी त्यांच्या मदतीसाठी थांबली नाही. गाडीचा स्फोट झाल्यानंतर १० ते १५ मिनिटांनी फायर ब्रिगेडची गाडी आली. या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली.

स्थानिक नागरिकांना जेव्हा या स्फोटाचा आवाज आला, तेव्हा त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पण प्रवासी होरपळत होते. स्थानिक नागरिकही येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे मदत मागत होते. पण एकही गाडी थांबली नाही. जर येणाऱ्या जाणाऱ्या चालकांपैकी कुणी मदत केली असती तर एवढे लोक गेले नसते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागिरिकांनी दिलीये.

बुलढाण्यात (Buldhana) ज्या बसचा अपघात झाला, त्याचे मालक होते विरेंद्र डारना. २०२० साली ही बस आपण विकत घेतल्याचं त्यांनी सांगितले. ही बस पूर्ण नवीन होती आणि ड्रायव्हरही चांगला अनुभवी असल्याचे डारना म्हणालेत. बसचा टायर फुटला आणि बस डिव्हायडरवर चढली अशी माहिती चालकाने दिली. त्यानंतर बस उलटली आणि त्यातच बसचा स्फोट झाला.

समृद्धी महामार्गावरचा (Samruddhi Mahamarg) हा काय पहिलाच अपघात नाही. जेव्हापासून हा हायवेचे लोकार्पण झालंय, तेव्हापासून ही अपघातांची मालिका सुरुचए. समृद्धी महामार्ग सामान्य प्रवाशांसाठी मृत्यू घेऊन आलाय की काय? गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांच्या मालिकांतून असंच दिसतंय. २६ जणांचा बळी गेल्यानंतर सरकार काही उपाययोजना करणार की असे अपघात होऊन मृतांची संख्या वाढतच जाणारे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! १० तोळ्याागे ७७०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धांतील मृत सैनिकांचा सन्मान कसा केला जात असे?

Box Office Collection: 'धुरंधर'ने मारली बाजी, केलं कोट्यवधींच कलेक्शन; जाणून घ्या कार्तिक आर्यनच्या चित्रपटाची कमाई

Gajkesari Rajog 2026: 2 जानेवारीपासून चमकणार या राशींचं भविष्य; 12 वर्षांनी बनणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग

SCROLL FOR NEXT