RTE Admission Saam Tv
महाराष्ट्र

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ५ एप्रिलनंतर विद्यार्थी नोंदणी; प्रवेशासाठीच्या जागा वाढल्या

Sambhajinagar News : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई  प्रवेशांतर्गत (RTE) मोफत प्रवेश दिला जातो. मात्र शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल केले आहेत. (Sambhajinagar) या बदलांमुळे आरटीईच्या प्रवेशासाठी जागा वाढल्या आहेत. आता या प्रवेशासाठी ५ एप्रिलनंतर विद्यार्थी नोंदणी करता येणार आहे. (Breaking Marathi News)

(Education Department) शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो. त्यात इंग्रजी शाळांचे (School) प्रमाण अधिक असते. हि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात असून विद्यार्थ्यांची नोंदणी केल्यानंतर सोडत काढून प्रवेश निश्चित केला जात असतो. २०२४- २५ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून ५ एप्रिलनंतर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यास सुरवात होणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा बदल केले असून राज्यभरात ७५ हजार ८५६ शाळांमधील ९ लाख ७१ हजार २२३ जागा आता प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. येत्या आठवड्यात म्हणजे ५ एप्रिलनंतर ही विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ हजार ५७० पैकी २ हजार ८१६ शाळांनी नोंदणी केलेली असून जिल्ह्यातील क्षमता ४० हजार ४५७ इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT