Marathwada Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Marathwada Water Crisis : मराठवाड्यात अजूनही १०२७ गावांना टँकरने पाणी पुरवठा; संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ५६० टँकर

Sambhajinagar News : यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची भीषण पाणी टंचाई जाणवत होती. प्रामुख्याने मराठवाड्यात अधिक दाहकता पाहण्यास मिळाली.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले असले, तरीही अजूनपर्यंत १४७९ गावांना १०२७ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. हीच टँकरची संख्या आठ दिवसापूर्वी १७०० च्या वर होती. मात्र काही ठिकाणी पाऊस पडल्याने यामध्ये घसरण होऊन टँकरची संख्या घटली.

यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची भीषण पाणी टंचाई (Water scarcity) जाणवत होती. प्रामुख्याने मराठवाड्यात अधिक दाहकता पाहण्यास मिळाली. साधारण मार्च महिन्यापासूनच पाण्याची समस्या जाणवत असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करत पाण्याची तहान भागविली जात होती. दरम्यान यंदा पावसाचे आगमन लवकर झाले असले तरी पुरेसा पाऊस झाला नाही. यामुळे पाण्याची समस्या अद्याप पूर्णतः मिटलेली नाही. यामुळे पाण्याचे टँकर अजूनही सुरूच असल्याचे पाहण्यास मिळत आहेत. 

सर्वाधिक टँकर संभाजीनगर जिल्ह्यात 

छत्रपती संभाजीनगर (sambhajinagar) जिल्ह्यातील ३६३ गावांना सद्यस्थितीला ५६० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून मराठवाड्यात सर्वाधिक टँकरची संख्या या जिल्ह्यात आहे. दरम्यान यंदा मे महिन्यात ओढावणारी स्थिती एप्रिल महिन्यातच निर्माण झाल्याने नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावं लागलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raw Banana Fry Recipe: भूक लागलीये? फक्त १० मिनिटांत तयार करा चवदार कच्ची केळी फ्राय

Anshula Kapoor Engaged: कपूर कुटुंबात लवकरच सनई चौघडे वाजणार! अंशुला कपूरच ठरलं; बॉयफ्रेंडनं 'या' ठिकाणी केलं प्रपोज

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Rain Alert : राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी, २५०० पदांसाठी भरती, पगार ८५००० रुपये; आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT