Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Marathwada Heavy Rain : मराठवाड्यातील २८ मंडळात अतिवृष्टी; ३९ दिवसात पावसाचे २६ बळी

Sambhajinagar News : राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. काही भागात जोरदार हजेरी लावली असून काही भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर  : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागासह मराठवाड्यात आठही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील २८ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या मंडळातील साधारण ५६० गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसात जीवितहानी देखील झाली आहे. 

राज्यात मागील काही दिवसांपासून (Rain) पाऊस सुरु आहे. काही भागात जोरदार हजेरी लावली असून काही भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान मराठवाड्याच्या अनेक भागात पावसानाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यात संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही मंडळाचा यात समावेश असून जवळपास ५६० गावे या जोरदार पावसामुळे चिंब झाली. तर (Sambhajinagar) संभाजीनगर जिल्ह्यातील ३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. 

पेरणीच्या दृष्टीने हा पाऊस समाधानकारक असला तरी देखील विभागातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांना अद्याप मोठ्या (Heavy Rain) पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान या झालेल्या पावसामुळे आजपर्यंत पाण्यात वाहून जाणे, विज पडून मृत्यू होणे आदीं सारख्या घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला. तर ५५ गोठ्यांची पावसामुळे पडझड झाली. शिवाय ३८५ लहान-मोठी जनावरही दगावली आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

iran and israel war News : गॅसनं वाढवलं तळीरामाचं टेन्शन; देशात दारुचा दुष्काळ पडणार?

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून एकावर डोळ्यात मिरची पावडर टाकून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT