Nathsagar Dam Saam tv
महाराष्ट्र

Nathsagar Dam : नाथसागरात केवळ पाच टक्के जलसाठा शिल्लक; गेल्या ५ वर्षातील सर्वात कमी जलसाठा

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरासह जवळपास ४०० गावांना नाथसागर धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. यातून सुमारे ४० लाख नागरिकांची तहान भागविली जाते

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या नाथसागर धरणात केवळ ५ टक्के उपयुक्त जलसाठा हा शिल्लक राहिला आहे. गेल्या पाच वर्षात मे महिन्याच्या अखेरीस असलेला हा सर्वात कमी जलसाठा आहे. यामुळे पाणी टंचाईची भीषणता अधिक तीव्र झाली आहे. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) शहरासह जवळपास ४०० गावांना नाथसागर धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. यातून सुमारे ४० लाख नागरिकांची तहान भागविली जाते. मात्र गेल्या वर्षी कमी पाऊस पडला, त्यामुळे हा प्रकल्प पूर्णपणे भरला नाही. त्यामुळे रब्बी पिकांसाठी पाण्याचे रोटेशन आणि पाणी पुरवठा योजनेसाठी करण्यात येणारा उपसा यामुळे धरणातील पाणी पातळी कमी कमी होत गेली.

मे अखेरपर्यंत साठा झाला कमी 

पाऊस कमी झाल्याने यंदा दुष्काळाचे सावट सर्वत्र घोंगावत होते. यात धरणात असलेला पाणी साठा बाष्पीभवनामुळे (Water Scarcity) कमी होत गेला. परिणामी नाथसागर धरणात सद्यस्थितीला केवळ ५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. मे महिना अखेरपर्यंत साथ कमी झाला असून मागील पाच वर्षातील हा सर्वात कमी साठा राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईमध्ये आलिशान कारला भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT