Nathsagar Dam Saam tv
महाराष्ट्र

Nathsagar Dam : नाथसागरात केवळ पाच टक्के जलसाठा शिल्लक; गेल्या ५ वर्षातील सर्वात कमी जलसाठा

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या नाथसागर धरणात केवळ ५ टक्के उपयुक्त जलसाठा हा शिल्लक राहिला आहे. गेल्या पाच वर्षात मे महिन्याच्या अखेरीस असलेला हा सर्वात कमी जलसाठा आहे. यामुळे पाणी टंचाईची भीषणता अधिक तीव्र झाली आहे. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) शहरासह जवळपास ४०० गावांना नाथसागर धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. यातून सुमारे ४० लाख नागरिकांची तहान भागविली जाते. मात्र गेल्या वर्षी कमी पाऊस पडला, त्यामुळे हा प्रकल्प पूर्णपणे भरला नाही. त्यामुळे रब्बी पिकांसाठी पाण्याचे रोटेशन आणि पाणी पुरवठा योजनेसाठी करण्यात येणारा उपसा यामुळे धरणातील पाणी पातळी कमी कमी होत गेली.

मे अखेरपर्यंत साठा झाला कमी 

पाऊस कमी झाल्याने यंदा दुष्काळाचे सावट सर्वत्र घोंगावत होते. यात धरणात असलेला पाणी साठा बाष्पीभवनामुळे (Water Scarcity) कमी होत गेला. परिणामी नाथसागर धरणात सद्यस्थितीला केवळ ५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. मे महिना अखेरपर्यंत साथ कमी झाला असून मागील पाच वर्षातील हा सर्वात कमी साठा राहिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT