Sambhaji Chhatrapati Saam Tv
महाराष्ट्र

Sambhaji Chhatrapati : छगन भुजबळांच्या भाषणावरून संभाजीराजे संतापले; मंत्रिपदावरून हकालपट्टीची मागणी

Sambhaji Chhatrapati : छगन भुजबळांच्या भाषणावरून संभाजी राजे संतापले असून त्यांनी त्यावर टीका केलीय.

Bharat Jadhav

Sambhaji Chhatrapati On Chhagan Bhujbal :

ओबीसी सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या भाषणावरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालीय. भुजबळांच्या वक्तव्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी टीकास्त्र सोडलंय. स्वतःचे राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत असल्याचा आरोप करत त्यांनी भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही केलीय. (Latest News)

आज अंबड येथे झालेल्या ओबीसी सभेत राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषण आंदोलनावरूनही भुजबळांनी टीका केली. भुजबळांच्या भाषणावरून संभाजी राजे संतापले असून त्यांनी त्यावर टीका केलीय. छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत.

सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावं अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, असं संभाजीराजे छत्रपती म्हणालेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगेच्या उपोषणावरून टीका

ओबीसी समाजाच्या एल्गार सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी जरांगे-पाटील यांच्या उपोषणावर जोरदार टीका केली. भुजबळ म्हणाले की, आमचे मंत्रीसुद्धा त्याच्या आंदोलनाच्या स्थळी जाऊन कंबरेत वाकले. जरांगे पाटील उपोषणावरून उठा-उठा असं म्हणत होते. मंत्र्यांनी इतके कंबर वाकवले की, त्यांना त्यांच्या कंबरेवर शेक द्यावा लागला असेल. त्याचबरोबर न्यायमूर्तींना देखील नेलं. पाचवी सुद्धा शिकलेल्या नसलेल्या जरांगे पाटलांना न्यायमूर्ती सर ,सर म्हणत होते.

मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले, अमुक-अमुक तारखेपर्यंत पाणी पिणार नाही. मग आमके-आमक्या आश्रमातील साधू बाबा आले मग त्यांनी सांगितलं, म्हणून मी पाणी पितो. त्यानंतर पाणी पिणार नाही. या वेळेपर्यंत काम झालं पाहिजे. तोपर्यंत पाणी पिणार नाही. मग महाराज आले आता महाराज यांचं नाकारू शकत नाही म्हणून मी पाणी पितो. आता याच्यापुढे पाणी पिणार नाही, असं जरांगे म्हणत असल्याची टीका भुजबळांनी केली.

प्रकाश आंबेडकरांचीही टीका

आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला. छगन भुजबळांनी जालन्यातील ओबीसी मेळाव्याच्या ठिकाणाहून मनोज जरांगेंना आव्हान देण्याची गरज काय होती, असा सवालही त्यांनी विचारलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT