दुःखद! घराला आग लागून वयोवृद्ध महिलेचा होरपळून जागीच मृत्यू! SaamTVNews
महाराष्ट्र

दुःखद! घराला आग लागून वयोवृद्ध महिलेचा होरपळून जागीच मृत्यू!

आगीत होरपळत असताना आजीने जोरजोरात आवाज दिला. पण, त्यांचा आवाज ऐकायला त्याठिकाणी कोणीही नव्हते. घरातील लहान मुलेही आजींना मदत करण्यास असमर्थ ठरली.

गोविंद साळुंके

अहमदनगर : अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील चिंचाळे येथे घराला आग लागून आगीमध्ये वयोवृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोळे गावातील शिवराम पारधे व त्यांची पत्नी नेहमीप्रमाणे सकाळी मोलमजुरी करण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान, स्वयंपाक करून झाल्यानंतर चुलीमध्ये थोडासा विस्तव राहिल्याने भर दुपारी चुलीत असलेल्या लाकडाने पेट घेतला.

हे देखील पाहा :

पाहता पाहता या आगीने रौद्र रूप धारण केले. तसेच धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात घरामध्ये तयार झाले. घरामध्येच शिवराम पारधे यांच्या वयोवृद्ध आई अनुसाया पारधे (वय 78) आणि तीन लहान मुले घरात होती. आग लागल्यानंतर या चिमुकल्यांनी घरातून पळ काढला. मात्र, अनुसया आजींना बाहेर पडता आले नाही. आगीत होरपळत असताना आजीने जोरजोरात आवाज दिला. पण, घराशेजारील सर्वच जण मोलमजुरी करणारे असल्याने शेतात कामाला गेले होते. आजीचा आवाज कोणालाही ऐकायला गेला नाही व त्यांना घराबाहेर पडताही आले नाही. त्यांचा या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT