राज्यांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांना RTPCR चाचणी बंधनकारक नाही - टोपे Saam Tv News
महाराष्ट्र

राज्यांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांना RTPCR चाचणी बंधनकारक नाही - टोपे

राज्यात लॉकडाऊन लागणार नाही - टोपे

लक्ष्मण सोळुंके

जालना - केंद्र सरकारच्या गाईडलाईन नुसार देशातील ईतर राज्यातून महाराष्ट्रात विमानाने येणाऱ्या प्रवाशांना दोन डोस घेतलेले असताना RTPCR चाचणी बंधनकारक असणार नाही. मात्र रिसकी देशांतून आलेल्यांना RTPCR चाचणी बंधनकारक असणार असून ७ दिवस क्वारंटाईन राहणं बंधंनकारक असणार आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते.

हे देखील पहा -

राज्यात पहिल्या डोसच लसीकरण 82 टक्के झालं असून दुसऱ्या डोसच 44 टक्के लसीकरण झालं आहे. साडेसात कोटी लोकांना लसीचा पहिला डोस दिला असून साडेचार कोटी लोकांना दुसरा डोस दिला देण्यात आला अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली. राज्यात लसीकरण वेगाने सुरु असून टारगेट पूर्ण होत नाही तोपर्यंत लसीकरण सुरूच राहील असंही ते म्हणाले. सद्या राज्यात लॉकडाऊन लावण्यासारख कोणतंही कारण नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावला जाणार नाही असंही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ

Face Care: चेहरा धुतल्यानंतर २ मिनिटांच्या आत करा हे काम; मेकअपशिवायही ग्लो करेल चेहरा

तुकाराम मुंढे यांचा शाळांसाठी नवा आदेश; शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी FDAची नवी नियमावली

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

SCROLL FOR NEXT