rohit pawar and bhagat singh koshyari  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'उशीरा का होईना महाराष्ट्र द्वेष्ट्याकडून राज्याची सुटका!..', रोहीत पवारांसह राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत?

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Politics : महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून महापुरुषांचा अपमान झाला. यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. तसेच तात्काळ त्यांना पदावरून काढून टाकावं अशी मागणी जोर धरू लागली. अशात आज त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे.तसेच महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर काही राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. (Latest Maharashtra Politics News)

उशीरा का होईना महाराष्ट्र द्वेष्ट्याकडून राज्याची सुटका! महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेले रमेश बैस यांचं अभिनंदन! ते संविधानाचा मान ठेवतील आणि राज्याची अस्मिता जपण्यासोबतच महान व्यक्तींचा अनादर न करता सन्मान राखतील, अशी अपेक्षा! त्यासाठी त्यांना शुभेच्छा!, असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासामध्ये राज्यपाल कसा नसावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगतसिंग कोशारीजी. महाराष्ट्राच्या अस्मितेची चाड असती तर याआधीच ईडी सरकारने राज्यपालांना परत बोलावण्याची विनंती केंद्राला केली असती ! #अतिथीकबजाओगे, असं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

कोष्यारींची उचलबांगडी झाली म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आपल्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पेढे वाटून आनंद साजरा करावा, असं मत राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख ट्विट करत व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्राचा मोठा विजय! महाराष्ट्रविरोधी राज्यपालांचा राजीनामा अखेर स्वीकारला! छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपली राज्यघटना, विधानसभा आणि लोकशाही आदर्श यांचा सातत्याने अपमान करणाऱ्याला राज्यपाल म्हणून स्वीकारता येणार नाही!, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

रमेश यांनी संवीधानाच्या चौकटीत राहून काम करावं. आधीच्या राज्यपालांनी सातत्याने महापुरुषांचा अपमान केला. देर आये दुरुस्त आये. मी मनापासून नव्या राज्यपालांचं स्वागत करते, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT