Ratnagiri Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News : कॉलेजवरून घरी परतत होत्या तरुणी; वाटेतच घडली भयंकर घटना, एकीचा मृत्यू

कॉलेजवरून घरी येत असणाऱ्या दोन तरुणींवर अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला. या हल्लात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

Satish Daud

अमोल कलये, साम टीव्ही

Ratnagiri Crime News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असताना, रत्नागिरी जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. कॉलेजवरून घरी येत असणाऱ्या दोन तरुणींवर अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला. या हल्लात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला.(Latest Marathi News)

तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. राजापूर तालुक्यातील भालावली गावात ही भयंकर घटना घडली. साक्षी मुकूंद गुरव असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. या हल्ल्यात (Crime News) सिद्धी संजय गुरव ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. जमिनीच्या वादातून हा हल्ला झाला असल्याची प्राथामिक माहिती आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही तरुणी भालवली वरची गुरववाडी येथील राहणाऱ्या आहेत. दोन्ही तरुणी भालावली सिनियर कॉलेज धारतळे येथे शिकत होत्या. बुधवारी त्या महाविद्यालयातून घरी येत असताना, वाटेत एका अज्ञात व्यक्तीने त्यांना अडवलं.

शिवीगाळ करत या व्यक्तीने दोन्ही तरुणींवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्लात साक्षीचा जागीच मृत्यू झाला. तर सिद्धी नामक तरुणी गंभीररित्या जखमी झाली. या घटनेनंतर हल्लेखोर हा पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोसळधार! राज्यात पावसाचे ७ बळी; मराठवाड्यात ११ जण बेपत्ता, कुठे कशी परिस्थिती?

Maharashtra Rain Live News: मेहेकर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Pune Monsoon Update : पुण्याला आज रेड अलर्ट, मुसळधार पावसाने झोडपले, पुणेकराच्या पाण्याचे टेन्शनही संपवले

Kisan Vikas Patra: ११५ महिन्यात पैसे होणार डबल; किसान विकास पत्र योजनेत मिळतो सर्वाधिक परतावा

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी हनुमानजींचे हे उपाय तुम्हाला करतील मालामाल, आर्थिक तंगी होईल दूर

SCROLL FOR NEXT