Raosaheb Danve Saam Tv
महाराष्ट्र

Raosaheb Danve: म्हणून राज्यात भाजपला फटका बसला, निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

Lok Sabha Elections Results: लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रामू ढाकणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्याच्या राजकीय वातावरणात बदल झाल्याचा फटका भाजपाला बसला आहे, असं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर त्यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

रावसाहेब दानवे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणूक झाल्या आणि त्यामध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. कार्यकर्ते खचून गेल्याचं दिसलं. त्यामुळं कार्यकर्त्यांना या अपयाशातून बाहेर काढण्यासाठी मी आता मतदारसंघाचा दौरा सुरु केला.

ते म्हणाले, 13 तारखेला अंबड, पैठण आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व विधानसभेचा दौरा करणार. आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी आता विभागवार बैठका देखील घेणार आहे.

दानवे म्हणाले की, या निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अपार कष्ट करून मेहनत घेतली. मात्र अपयश आलं. निवडणुकीत पराभवाची वेगवेगळी कारणे असतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच आम्ही कष्ट करून बाजी मारू.

ते पुढे म्हणाले, ''कोणत्या एका व्यक्तीमुळे आमचा परभव झाला नाही. राज्याच्या वातावरणामध्ये अचानक बदल झालं आणि त्याचा फटका पक्षाला बसला. अब्दुल सत्तारच्या टोपी काढण्याच्या कार्यक्रमाला मी नक्की जाणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. माझा पराभव झाल्याचा आनंद सत्तारांना होत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे.''

रावसाहेब दानवे म्हणाले, ''माझ्या मुलाच्या मतदारसंघात सुद्धा मला लीड मिळाली नाही. मग त्यात माझ्या मुलाने माझ्या विरोधक काम केलं, असं म्हणू का? त्यामुळे कुणालाही दोष देता येणार नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran Israel war : तेलाचा खेळ बदलला! रशियाचा वाटा घटला, आता भारताला इंधन कुठून मिळणार?

ICC T20 WC 2026: विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; BCCI कडून १३१ कोटींचं बक्षीस

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील कमर्शियल गॅस वितरण बंद

Narayanpet Saree Types: लग्नसराईत यावेळी खरेदी करा नारायणपेठ साडी, पाहा या ७ ट्रेंडी बजेटमध्ये असलेल्या डिझाईन्स

Rajya Sabha Election: शरद पवार, रामदास आठवलेंसह २६ जण बिनविरोध खासदार, 'या' ११ जागांसाठी होणार निवडणूक

SCROLL FOR NEXT