छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चाललो तर...! ; राष्ट्रपतींचा विश्वास
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चाललो तर...! ; राष्ट्रपतींचा विश्वास Saam TV
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चाललो तर...! ; राष्ट्रपतींचा विश्वास

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना किल्ले रायगडावरून केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गावर चाललो तर 21 व्या शतकात स्वराज्याची प्रति कल्पना आपण साकारू शकतो असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज किल्ले रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल. यावेळी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांना दांडपट्टा, भवानी तलवार, अज्ञापत्राची प्रत आणि शिवकालीन होणची प्रतीकृती भेट दिली.

या दौर्‍याचे दरम्यान राष्ट्रपती महोदयांनी प्रथम होळीच्या माळावारील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर दौऱ्याच्या शेवटी शिव समाधीचे दशन घेतले. राजसदर येथे छोटेखान कार्यक्रमात राष्ट्रपती महोदयांचा आदर सत्कार छत्रपती संभाजी राजे यांच्याकडून करण्यात आला. यावेळी राष्ट्रपतींनी शिव छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि देशातील पहिल्या नौदलाच्या स्थापनेबद्दल कौतुकोद्गार काढले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : राहुल गांधी एक प्रवासी, देवेंद्र फडणवीस यांंचा खोटक टोला

Relationship Tips: 'या' मुलांच्या प्रेमात चुकूनही पडू नका; आयुष्य होईल उद्धस्त

MI vs KKR, IPL 2024: मुंबई की कोलकाता? कोण मारणार बाजी? पाहा दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

Health Tips: एक महिना साखर खाणं करा बंद; शरीराला होतील अनेक फायदे

Kiran Sarnaik |आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा अपघात

SCROLL FOR NEXT