अकोल्यात रक्तयज्ञ आंदोलन; दिल्लीतील आंदोलनात मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली! SaamTvNews
महाराष्ट्र

अकोल्यात रक्तयज्ञ आंदोलन; दिल्लीतील आंदोलनात मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली!

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी 'रक्तयज्ञ' या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यात शेतकरी जागर मंचच्या वतीने रक्तयज्ञ आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देण्यासाठी 'रक्तयज्ञ' या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताचा एक थेंब रक्तयज्ञात टाकला. यावेळी शंभरच्या वर आंदोलकांनी रक्तदान केले.

हे देखील पहा :

विशेष म्हणजे या आंदोलनात किन्नरांनीही उस्फुर्त सहभाग नोंदवला. 26 नोव्हेंबरला शेतकरी आंदोलनाला एक वर्ष होत आहे. कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तरी सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासने पाळली नाहीत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

तर, तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान 759 शेतकऱ्यांचा जीव गेला त्यासाठी शेतकरी जागर मंच तर्फे रक्तयज्ञ अर्थात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Edited By : Krushnarav sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT