Raju Shetti 
महाराष्ट्र

शेतकरी विरोधी सरकारला गुडघे टेकायला लावू : राजू शेट्टी

विजय पाटील

उत्पादन पेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकला जात आहे. तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर आणि बँकांचा तगादा यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे चित्र बदलायचे असेल तर शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे असेही राजू शेट्टींनी नमूद केले.

सांगली : एक रकमी एफआरपी वर आम्ही ठाम आहाेत. परंतु केंद्र सरकारने एफआरपी frp तीन तुकड्यात देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर कळस म्हणजे राज्य सरकार वर्षभरात तीन तुकड्यात एफआरपी देऊ असे म्हणत आहे. खरं तर ही दोन्ही सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहेत. आम्ही यांना गुडघे टेकायला लावू असा इशारा देत एक रकमी एफआरपी घेऊ असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी Raju Shetti यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला. सांगली येथे आज एका शेती विषयक कंपनीच्या उदघाटनास शेट्टी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शेट्टी म्हणाले सव्वा दोन महिने उलटून गेले अद्यापही पूरग्रस्तांना सरकारने मदत दिली नाही. आता केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येणार आहे. मला कळत नाही आता येऊन हे पथक काय पाहणार आहे. या सर्व गाेष्टीवरून कळते केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या विषयी किती तळमळ आहे.

राज्य सरकारची अद्यापही काही ठिकाणी मदत पोहचली नाही. आम्ही यासाठी जल समाधी आंदोलन सुद्धा केले. अजून काय करायचे तेव्हा सरकार मदत करणार असा प्रश्न शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे. शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळाली नाही तर महाविकास आघाडीतील नेत्यांची दिवाळी गाेड लागू देणार नाही असा इशारा शेट्टींनी दिला. 

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT