#परीक्षांचाधंदाथांबवा; देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना राजेश टोपे यांचे उत्तर Saam Tv
महाराष्ट्र

#परीक्षांचाधंदाथांबवा; देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना राजेश टोपे यांचे उत्तर

परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी मी किती मेहनत घेतली हे फडणवीस यांना माहीत आहे

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यामुळे आज दिवसभर परिक्षार्थींमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या परीक्षेमध्ये दलाल शिरले, असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हे देखील पहा-

तर या परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी मी किती प्रयत्न केलेत आणि किती मेहनत घेतली हे फडणवीस यांना माहीत आहे. मात्र, प्रत्येक परीक्षेत काही प्रवृत्त्या असे वाईट काम करत असतात, असेही टोपे यांनी म्हटले आहे. मात्र, येणाऱ्या ८- १० दिवसांत पारदर्शक परीक्षा घेतल्या जाणार असून, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन एकत्रितपणे घेण्यात आल्याचे राजेश टोपेंनी सांगितले आहे.

आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षेसाठी जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला आहे. काहींना रेल्वे स्टेशनवर तर आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी परीक्षेसाठी मोठ्या आशेने आले होते. मात्र, ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनवर आणि बस स्थानकवरती रात्र काढावी लागली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT