Raj Thackeray and Devendra Fadnavis clash over Aurangzeb tomb  Saam Tv News
महाराष्ट्र

Aurangzeb Tomb : औरंगजेबाची कबर, फडणवीस-ठाकरे भिडले, संघानेही टोचले कान; कबरीचा वाद भाजपच्या अंगलट?

Aurangzeb Tomb Controversy : औरंगजेबाच्या कबरीच्या वादात राज ठाकरेंनी उडी घेत सरकारवर हल्लाबोल केलाय. तर संघानेही भाजपचे कान टोचलेत. नेमकं काय घडलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.

Prashant Patil

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : औरंगजेबाच्या कबरीच्या वादाने पुन्हा एकदा राजकारण पेटलंय. या वादात आता राज ठाकरेंनी उडी घेतलीय. औरंगजेबाची कबर नाही तर कबरीभोवतीची सजावट हटवा. कारण औरंगजेबाच्या कबरीमुळे मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास असं म्हणत कबर हटवण्याला विरोध केला. तर फडणवीसांनीही राज ठाकरेंना सडेतोड उत्तर दिलंय.

राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचं एमआयएमने स्वागत केलंय. तर वाद पेटवणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचा सल्लाही इम्तियाज जलील यांनी दिलाय. तर औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या भाजपचे संघानेच कान टोचलेत.

औरंगजेबाची कबर हटवण्याला भाजपने हवा दिली होती. एवढंच नाही तर भाजपच्या नेत्यांकडून कबर हटवण्याबद्दल उघड भूमिका घेतली जात होती. त्यातच आता हिंदूत्ववादी पक्ष असलेल्या मनसेने आणि भाजपची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भाजपच्या विरोधात भूमिका घेतलीय.. त्यामुळे भाजप आतातरी कबरीचा मुद्दा सोडून राज्यातील इतर महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharmendra - Sunny Deol: 'बॉर्डर २'च्या टीझर लाँच दरम्यान सनी देओलचं डोळे पाणावले, नेमकं झाल काय? VIDEO

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Expressway Accident : मुंबई एक्सप्रेसवेवर भयानक अपघात, भल्या पहाटे पिकअपचा कोळसा, ३ जण जिवंत जळाले

ZP School Jobs: तयारीला लागा! जिल्हा परिषद शाळेत ८००० शिक्षकांची भरती; निवडणुका संपताच नोटिफिकेशन निघणार

नवं वर्ष लय 'महाग' जाणार! मोबाइल कंपन्यांचे रिचार्ज २० टक्क्यांपर्यंत वाढणार, 'खिसाफाड' रिपोर्टमधील दाव्यानं यूजर्सना धडकी

SCROLL FOR NEXT