Raigad Breaking News saam tv
महाराष्ट्र

Raigad Breaking News: रायगडच्या गणेश विसर्जनात विघ्न; उल्हास नदीत ४ जण वाहून गेले, एकाचा मृत्यू

Raigad Breaking News: रायगडच्या कर्जत येथील उल्हास नदीत विसर्जनासाठी गेलेले चार गणेशभक्त वाहून गेल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

सचिन कदम

Raigad News:

रायगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. रायगडच्या कर्जत येथे गणपती विसर्जनासाठी गेलेले चार गणेशभक्त उल्हास नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तर एक जण सुखरुप बचावला असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या कर्जत येथील उल्हास नदीत चार गणेशभक्त विसर्जनासाठी गेले होते. या गणेशभक्तांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने चार जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. कर्जतमधील उकृल येथील ही घटना आहे. आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.

या उल्हास नदीत वाहून गेलेल्या चौघांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. तर एकजण सुखरूप बचावला आहे. तसेच या घटनेत दोन जण बेपत्ता असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या दोन्ही बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

SCROLL FOR NEXT