Raigad Breaking News saam tv
महाराष्ट्र

Raigad Breaking News: रायगडच्या गणेश विसर्जनात विघ्न; उल्हास नदीत ४ जण वाहून गेले, एकाचा मृत्यू

Vishal Gangurde

सचिन कदम

Raigad News:

रायगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. रायगडच्या कर्जत येथे गणपती विसर्जनासाठी गेलेले चार गणेशभक्त उल्हास नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तर एक जण सुखरुप बचावला असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या कर्जत येथील उल्हास नदीत चार गणेशभक्त विसर्जनासाठी गेले होते. या गणेशभक्तांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने चार जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. कर्जतमधील उकृल येथील ही घटना आहे. आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.

या उल्हास नदीत वाहून गेलेल्या चौघांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. तर एकजण सुखरूप बचावला आहे. तसेच या घटनेत दोन जण बेपत्ता असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या दोन्ही बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT