Rahuri Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Rahuri Bajar Samiti: ४० टक्के निर्यात शुल्काच्या निर्णयाविरोधात राहुरी बाजार समिती बंद

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे

राहुरी (अहमदनगर) : २४१० रुपये दराने कांदा खरेदी म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभुल करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी (Farmer) संघटनेने केला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात (Rahuri) शुल्क ४० टक्के वाढविले आहे. या विरोधात आज राहुरी बाजार समितीमधील लिलाव बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. (Breaking Marathi News)

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीरामपूर बाजार समितीत आज कांदा लिलाव बंद ठेवत व्यापा-यांनीही शेतक-यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केले जात असून केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत.  

केंद्र सरकार २४१० रुपये दराने महाराष्ट्रातील २ लाख मेट्रिक टन कांदा (Onion) खरेदी करणार असून नाशिक, अहमदनगरमध्ये विशेष खरेदी केंद्र उभारणार येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मात्र शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांच्या कांद्याला ४०० ते ५०० रुपये दर मिळत असताना सरकार झोपले होते का? असा सवाल देखील शेतकऱ्यांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT