Rahul Gandhi Remark On Veer Savarkar
Rahul Gandhi Remark On Veer Savarkar  saam tv
महाराष्ट्र

राहुल गांधींच्या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीत फूट पडू शकते?, काँग्रेसच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

Nandkumar Joshi

Rahul Gandhi Remark On Veer Savarkar : शेगाव : भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने मोठे प्रतिसाद आणि प्रेम दिलेलं आहे. हे काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुल गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटिशांसमोर झुकले नाहीत, हे सांगताना त्याची तुलना सावरकरांशी केली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी इतिहासात काय घडलं होतं याकडं लक्ष देण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा, असा सल्ला देतानाच राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळं महाविकास आघाडीतही फूट पडू शकते, असं विधान शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर शेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयराम रमेश यांनी स्पष्ट भूमिका मांडली. (Maharashtra News)

सावरकारांच्या (Veer Savarkar) मुद्द्यावरून महाराष्ट्रातील काही पक्ष आणि संघटना नाहक वातावरण तापवत आहेत. सावरकरांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे ते कसे नाकारता? असा सवाल उपस्थित करून भारत जोडो यात्रेचा हा एकच मुद्दा नाही. यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसने इतिहासाची मोडतोड करुन मांडणी केलेली नाही. द्विराष्ट्रवादाचा सिंद्धात सावरकर यांनीच मांडला. १९४२ च्या भारत छोडो, चले जावच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होते हे ऐतिहासिक सत्य आहे, असे रमेश म्हणाले.

राहुल गांधींच्या सुरक्षेची सर्वांनाच चिंता

भारत जोडो यात्रेला प्रचंड समर्थन मिळत असल्याने काही लोक विरोध करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांच्या सुरक्षेची सर्व भारतयात्रींना चिंता आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेत कसलीही तडजोड केली जाणार नाही, असे रमेश यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेत नारीशक्ती

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उद्या, १९ नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेत ९० टक्के महिलांचा सहभाग असेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

महिलांचा राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्याचा निर्णय इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी घेतला होता. यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देशभर महिलांचे प्रतिनिधित्व वाढलेले आहे. उद्या नारीशक्तीचे दर्शन भारत जोडो यात्रेत होईल, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT