पूर्णा नदीला पूर आल्यामुळे 'या' दोन तालुक्यांचा संपर्क तुटला! अॅड, जयेश गावंडे
महाराष्ट्र

पूर्णा नदीला पूर आल्यामुळे 'या' दोन तालुक्यांचा संपर्क तुटला!

नदीकाठावरील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : अमरावती जिल्ह्यातील (Amravati) काही भागांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे पूर्णा नदीला (Purna River) मोठा पूर आला असून अकोला (Akola) जिल्ह्यातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे अकोला- अकोट महामार्ग (Akola-Akot Highway) बंद झाला आहे. गांधीग्राम येथील ब्रिटिश कालीन पुलावरून पाणी वाहत असल्याने अकोला जिल्ह्याचा अकोट तालुक्याशी संपर्क तुटला आहे. Purna river is flooded

हे देखील पहा-

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून नदीकाठावरील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये अमरावती, अकोला जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे पूर्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

पूर्णा नदीला मोठा पूर आला असून अकोला जिल्ह्यातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामध्ये अकोट- अकोला महामार्गावरील पूर्णा नदीवर असलेल्या पुलाच्या पाच फूट वरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अकोल्याचा अकोट तालुक्याशी संपर्क तुटलाय. तर बैतुल कडे जाणारा मार्गही बंद झालाय. दरम्यान या पुलावरून प्रवास करणे टाळावे तसेच परिसरातील गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT