Food Poisoning Saam TV
महाराष्ट्र

Food Poisoning: उपवासाच्या भगरीतून २० ते २५ जणांना विषबाधा; परभणी जिल्ह्यातील खळबळजनक घटना

राजेश काटकर

Parbhani Food Poisoning News

भागवत एकादशी आणि महाशिवरात्रीनिमित्त उपवास करणाऱ्या २० ते २५ जणांना भगरीतून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि गंगाखेड तालुक्यात गुरुवारी (ता. ७) सायंकाळच्या सुमारास घडली. भगर खाल्याने अनेकांना मळमळ, चक्कर, उलटी व पोटात दुखणे असा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेनं संपूर्ण जिल्हाभरात (Parbhani News) एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात गुरुवारी (ता. ७) काही जणांनी भागवत एकादशीचा उपवास केला होता. उपवासात भगर खाल्ल्याने त्यांना चक्कर येणे, पोटात दुखणे तसेच मळमळीचा त्रास सुरू झाला.

हा प्रकार लक्षात येताच ७ जणांना उपचारासाठी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता, भगरीतून विषबाधा झाल्याचं निष्पन्न झाले. सध्या सातही जणांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

दुसऱ्या घटनेत गंगाखेड तालुक्यातून अशीच घटना समोर आली. उपवासात भगर खाल्ल्याने तालुक्यातील १२ ते १५ जणांना मळमळ, उलटी, चक्कर येणे असा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना गंगाखेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

एकाच दिवशी २० ते २५ जणांना भगरीतून विषबाधा झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या बाधित झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. महाशिवरात्रीनिमित्त उपवासात भगर खाऊ नये, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला स्वत:च्या रक्षणासाठी 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

SCROLL FOR NEXT