Onion
Onion Saam Tv
महाराष्ट्र

कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव; निराश शेतकऱ्यानी उचललं टोकाचं पाऊल

लक्ष्मण सोळुंके

अहमदनगर - कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकऱ्यानी (Farmer) बाजार समिती मध्येच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भारत जाधव असं या शेतकऱ्याचं नाव असून 1 रुपये किलो प्रमाणे कांद्याची भाव बोली झाल्याने व्यापाऱ्या समोरच शेतकऱ्याने विष प्राशन केलं शेतकऱ्याला रुग्णालयात (Hospital) तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आल असून सध्या हा शेतकरी मृत्यूशी झुंज देत आहे.

हे देखील पाहा -

कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल आहे. कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवाल दिल झाला असल्याचे पाहिला मिळत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भारत जाधव या शेतकऱ्यानी रक्त आठवण पिकवलेला कांदा कवडीमोल ठरला.

जाधव या शेतकऱ्याने 25 क्विंटल कांदा श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान उपबाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेला होता. 25 किंट्टोल कांद्याचे 1 रुपये भावाप्रमाणे अडीच हजार रुपये मिळत असल्याने वाहतुकीचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आणि बाजार समिती मध्ये व्यापाऱ्या समोरच विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती जवळच्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याला तातडीने श्रीरामपूर साखर कामगार रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. सध्या हा शेतकरी मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gallbladder Stone : पित्त खड्यांमुळे होऊ शकतो कर्करोग; वेदना कायमच्या दूर करण्यासाठी ५ रामबाण उपाय

Today's Marathi News Live : नाराज आबा बागुल काँग्रेस रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात

Salman Khan News : भाईजान अर्ध्या रात्री लंडनहून मुंबईत परतला; विमानतळावर पापाराझींची नजर चुकवत गाठलं घर

Bhiwandi Constituency: भिवंडी मतदारसंघात राजकारण तापलं, काॅंग्रेस नेते दयानंद चोरगे उमेदवारी अर्ज दाखल करणार?

Commuters Falls From Train : लोकलगर्दीचे बळी! ५ दिवसांत ३ प्रवाशांचा ट्रेनमधून पडून मृत्यू

SCROLL FOR NEXT