NCP On Maharashtra Drought Situation Saam tv
महाराष्ट्र

NCP On Maharashtra Drought Situation: राष्ट्रवादीने सरकारला धरले धारेवर, राज्यातील दुष्काळाचा पाढाच दाखवला वाचून

NCP On Maharashtra Government: राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) सरकारकडे राज्यात दुष्काळ जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

Priya More

Maharashtra Drought Situation: ऑगस्ट महिना संपत आला तरी राज्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आला आहे. पाऊस नसल्यामुळे राज्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) सरकारकडे राज्यात दुष्काळ जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

अशामध्ये आता याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे सरकारवर निशाणा साधला आहे. 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला 'दुष्काळ आपल्या दारी' येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का?, असा संतप्त सवाल जयंत पाटील यांनी सरकारला (Maharashtra Government) केला आहे.

राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवरुन जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरले आहे. जयंत पाटील यांनी यासंदर्भात ट्वीट करत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'सद्य:स्थितीत ३२९ महसुली मंडळात पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील १८ जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे.'

'सर्वात कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. सरासरीपेक्षा ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील बऱ्याचशा भागात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. पिके जळून गेली आहेत. कोरडवाहू, जिरायती शेतीतील जवळपास ७० टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा झाली आहेत. शेतकऱ्यांनी शेतीत पेरणी, बियाणे-रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या गुंतवणूकीचा परतावा परत मिळेल का ही चिंता आहे.' असे म्हणत जयंत पाटील यांनी सरकारला राज्यातील परिस्थितीचा पाढा वाचून दाखवला आहे.

तसंच, राज्यातील चारा प्रश्नाचा देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. 'खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे चाऱ्याचे फारसे उत्पादन झालेले नाही. जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पशुधन वाचवण्याची देखील मोठी चिंता निर्माण झाली आहे.'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला 'दुष्काळ आपल्या दारी' येऊन ठेपलाय याची पुसटशी तरी जाणीव आहे का?', असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT