ncp sharad pawar faction will contest more seats in vidhan sabha election says jayant patil
ncp sharad pawar faction will contest more seats in vidhan sabha election says jayant patil Saam Digital
महाराष्ट्र

Vidhan Sabha Election: राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गट विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढवणार? संख्येबाबत जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं (पाहा व्हिडिओ)

विजय पाटील

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जास्ती जास्त जागांवर लढेल असा दावा आणि विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी आत्ताच संख्या सांगणार नाही अन्यथा त्यावर चर्चा सुरु हाेईल असेही स्पष्ट केले.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे जयंत पाटील हे एका सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. ते म्हणाले सगळे होते त्यावेळी चार खासदार निवडुन आले होते. आता जवळपास सगळे कमी झाले. त्यामुळे चार-पाच होतील असं वाटलं होतं पण मतदान चाराचे 8 झालेत असा अप्रत्यक्ष टाेला जयंत पाटलांनी अजित पवार गटाला लगावला.

जयंत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघात थोडं दुर्लक्ष झाल्याचे म्हटले. त्यामुळे फटका बसला पण या मतदारसंघात धनशक्तीचा विजय झाला. जनशक्ती ही सत्यजित पाटलांच्या सोबतच आहे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणुकीत सांगलीत तीन जागा लढवणार आहाेत मात्र आणखी एक दुसरी जागा मिळवायची आहे असे जयंत पाटलांनी स्पष्ट केले. मात्र सांगली जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघावर दावा सांगणार हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.

सांगली लोकसभेच्या जागा वाटपामध्ये आपला काहीच संबंध नव्हता,मात्र आपल्या बद्दल गैरसमज पसरला असे स्पष्टीकरण जयंत पाटलांनी देत कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसने घेतल्याने शिवसेनेने सांगलीची काँग्रेसची जागा घेतल्याचे त्यांनी आज जाहीर केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT