Farmers Andolan Saam Tv
महाराष्ट्र

Farmers Andolan: शेतकऱ्यांचे आमदारांना फोन करो आंदाेलन, जाणून घ्या कारण

अतिवृष्टीमुळे झालेल्या कांदा नुकसानीचे जाहीर झालेलं अनुदान अद्याप मिळालेलं नसल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आमदारांना फोन करो आंदोलन

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

Nashik Onion Farmer: कांद्याच अनुदान मिळावे, यासाठी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता फोन करो आंदोलन हाती घेतलंय. कांदा अनुदान मिळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपआपल्या तालुक्यातील आमदारांना फोन करो आंदोलन करावं, असं आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं केलंय. (Latest Marathi News)

अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई अनुदान आणि चार महिन्यांपूर्वी जाहीर झालेले कांदा अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यावर वर्ग झालेले नाही. कालपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झालय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील आमदारांना फोन करावेत असं आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं केलंय. (Nashik News)

यासोबतच तत्काळ सरसकट सर्व अर्ज जमा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची मागणी संबंधित आमदारांनी विधीमंडळ अधिवेशनात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी फोनवर करावी.

जोपर्यंत याबाबत अधिवेशनात ठोस भूमिका घेतली जात नाही तोपर्यंत प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदारांना फोन करत राहावेत, असं आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT