Nashik Farmer Rasta Roko News Saamtv
महाराष्ट्र

Nashik Farmer News: निर्यात शुल्काच्या विरोधात शेतकरी आक्रमक! नाशिकमध्ये स्वाभिमानी संघटनेचा रास्ता रोको; वाहतूक ठप्प

Nashik Farmer Rasta Roko: कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याच्या निर्णयानंतर राज्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत

अजय दुधाणे

Nashik Onion Farmer News: कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच नाफेडने खरेदी केलेला कांदाही बाजारात आणला जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत आंदोलन छेडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र शासनाने देशात कांद्याचे दर वाढत असल्यामुळे निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर नाशिक (Nashik) आणि पुणे (Pune) जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्या आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे.

तसेच नाशिकच्या येवला येथे शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला. मनमाड-येवला मार्गावर बाजार समिती समोर रास्ता रोको सुरू केला असून शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या रास्ता रोकाने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती (Nashik Bajat Samitee) बंदला नगर जिल्ह्यातील किसान सभेने पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारच्या सततच्या शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी एकत्र येण्याच केलं आवाहन किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT