Narayan Rane
Narayan Rane 
महाराष्ट्र

राणेंची चुप्पी; माध्यमांकडे कटाक्षही टाकला नाही

अनंत पाताडे

सिंधूदूर्ग : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीस दिल्लीला जाण्यासाठी आज (साेमवार) केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश बंगल्यातून बाहेर पडले. जन आशीर्वाद यात्रेची सांगता करताना आणि त्यापुर्वी देखील राणेंनी माध्यमांना आता मी सावध पावलं टाकणार असल्याचे सांगितले हाेते. त्याची कृतीच जणू त्यांनी आज बंगल्याच्या बाहेर पडल्यानंतर करुन दाखवली. त्यांनी माध्यमांशी बाेलणे टाळले. माध्यम प्रतिनिधींकडून राणेंनी Narayan Rane ढुकुंन देखील पाहिले नाही.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज महाड न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे शाखेत हजर राहणे अपेक्षीत हाेते. त्यांच्या वकीलांनी राणेंच्यावतीने त्यांचे म्हणणे गुन्हे शाखेत जाऊन मांडले. आज मंत्री राणे दुपारी तीन वाजता गाेवा येथून दिल्ली जाणार आहेत. त्यासाठी ते नुकतेच कणकवली येथून रवाना झाले.

दरम्यान अटक सत्रानंतरच्या घडामाेडी नंतर मंत्री राणे यांनी मी जेव्हा बाेलायचे तेव्हा बाेलणार, मी आता सावध पावलं टाकणार असल्याचे माध्यमातून वारंवार सांगत आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या सांगता करताना देखील झालेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी काय बाेलायचे कूठ बाेलायचे हे मी ठरवीन असे म्हणत अधिक बाेलणे टाळणे पसंत केल्याचे स्पष्ट केले.

आज महाड येथे ते का गेले नाहीत याची विचारणा करण्यासाठी अथवा अन्य काही बाबींसाठी माध्यमांचे प्रतिनिधी त्यांची बंगल्याबाहेर वाट पहात हाेते. मंत्री राणे बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर थेट वाहनाकडे गेले. त्यांनी कुणाकडे कटाक्षही टाकला नाही.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

Amruta Khanvilkar : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; साडीत अमृताचे क्लासिक फोटोशूट

Special Report : मनसे नेते Avinash Jadhav यांच्या अडचणीत वाढ? जाधवांवर खंडणीचा गुन्हा दाखल

Uddhav Thackeray: १० वर्षापूर्वी चहावर चर्चा केली, आता कामावर चर्चा करा; उद्धव ठाकरेंनी PM मोदी- शहांना केलं लक्ष्य

SCROLL FOR NEXT