नंदुरबारकरांनो पाणी जपून वापर! धरणात फक्त 50 टक्केच पाणीसाठा शिल्लक  दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबारकरांनो पाणी जपून वापर! धरणात फक्त 50 टक्केच पाणीसाठा शिल्लक

नंदुरबार शहराला दसऱ्यानंतर दोन दिवसांआड पाणीपुरवठा होणार; नगरपालिकेचा निर्णय...

नंदुरबार दिनू गावित

नंदुरबार - जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे अनेक लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा जमा झाला आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात केवळ 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने नंदुरबार नगर परिषदेने दसऱ्यानंतर नंदुरबार शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

नंदुरबार शहरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त वापर कमी करून पाणीबचत करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून भविष्यात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही. जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे लघु मध्यम प्रकल्पांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा जमा झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यावर व शेती सिंचनावर मोठा परिणाम होणार असून प्रशासनाने उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील पाणी जपून वापरण्याची काळाची गरज आहे. अन्यथा पाणीबाणी संकटाला सामोरे जावे लागेल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT