नंदुरबारकरांनो पाणी जपून वापर! धरणात फक्त 50 टक्केच पाणीसाठा शिल्लक  दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबारकरांनो पाणी जपून वापर! धरणात फक्त 50 टक्केच पाणीसाठा शिल्लक

नंदुरबार शहराला दसऱ्यानंतर दोन दिवसांआड पाणीपुरवठा होणार; नगरपालिकेचा निर्णय...

नंदुरबार दिनू गावित

नंदुरबार - जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे अनेक लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा जमा झाला आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात केवळ 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने नंदुरबार नगर परिषदेने दसऱ्यानंतर नंदुरबार शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

नंदुरबार शहरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त वापर कमी करून पाणीबचत करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून भविष्यात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही. जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे लघु मध्यम प्रकल्पांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा जमा झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यावर व शेती सिंचनावर मोठा परिणाम होणार असून प्रशासनाने उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील पाणी जपून वापरण्याची काळाची गरज आहे. अन्यथा पाणीबाणी संकटाला सामोरे जावे लागेल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दत्तशिखर देवस्थानचे महंत श्री मधुसूदन भारती महाराज यांचे निधन

Saffron Benefits in Pregnancy : प्रेग्नंसीत केशर खाल्ल्याने बाळ गोरं होतं का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

Panvel Tourism : पनवेलमध्ये लपलाय निसर्ग सौंदर्याचा खजिना, वीकेंडला लोकल ट्रेन पकडा अन् थेट 'या' स्पॉटवर पोहचा

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

SCROLL FOR NEXT