Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Virchakra Dam : नंदुरबारचा पाणी प्रश्न मिटला; वीरचक्र धरण भरले, १६ गावांना सतर्कतेचा इशारा

Rajesh Sonwane

सागर निकवडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे वीरचक धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी शिवण नदी इथली भरून वाहत आहे. 

नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यात मागील दोन दिवस मुसळधार (Rain) पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी, नाल्यांना पाणी आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने नंदुरबारच्या विरचक धरण हे खाली होते. मात्र आता वीरचक्र धरण पूर्ण भरले असून धरणाचे तीनही दरवाजे १५ सेंटीमीटरने वर उचलण्यात आले आहे. यामुळे शिवण नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्याने शिवन नदीकाठच्या १६ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 

पाणी टंचाईचा प्रश्न मिटला 

नंदुरबार शहरवासीयांना मोठ्या प्रमाणात पाणी कपातीचे संकट होते. नंदुरबार शहराला तब्बल तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. मात्र आता धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नंदुरबारकरांवरचे पाणी टंचाईचे संकट देखील संपणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT