Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Virchakra Dam : नंदुरबारचा पाणी प्रश्न मिटला; वीरचक्र धरण भरले, १६ गावांना सतर्कतेचा इशारा

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी, नाल्यांना पाणी आले आहे

Rajesh Sonwane

सागर निकवडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे वीरचक धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी शिवण नदी इथली भरून वाहत आहे. 

नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यात मागील दोन दिवस मुसळधार (Rain) पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी, नाल्यांना पाणी आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने नंदुरबारच्या विरचक धरण हे खाली होते. मात्र आता वीरचक्र धरण पूर्ण भरले असून धरणाचे तीनही दरवाजे १५ सेंटीमीटरने वर उचलण्यात आले आहे. यामुळे शिवण नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्याने शिवन नदीकाठच्या १६ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 

पाणी टंचाईचा प्रश्न मिटला 

नंदुरबार शहरवासीयांना मोठ्या प्रमाणात पाणी कपातीचे संकट होते. नंदुरबार शहराला तब्बल तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. मात्र आता धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नंदुरबारकरांवरचे पाणी टंचाईचे संकट देखील संपणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT