Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: बॅक वॉटरमधून जीव धोक्यात घालून प्रवास; पुलाचा प्रतीक्षेत ग्रामस्थ

बॅक वॉटरमधून जीव धोक्यात घालून प्रवास; पुलाचा प्रतीक्षेत ग्रामस्थ

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पामुळे धडगाव आणि अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील १० ते १२ गावांना जोडणाऱ्या बिलगाव येथील नर्मदा नदीवरील पुलाचे काम अपूर्ण आहे. यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून नर्मदा नदीच्या (Narmada River) बॅक वॉटरमधून प्रवास करावा लागत आहे. या पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी विविध संघटनी केली आहे. (Letest Marathi News)

नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पामुळे धडगाव तालुक्यांतील बिलगाव ते सवाऱ्यादिगर परिसरातील दहा ते बारा गावांना आणि पंधरा ते वीस पाड्यांना जोडणारा उदय नदीवरील पूल गेल्या दहा ते बारा वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. जवळपास सात हजार नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मात्र आदिवासी विकास विभाग आणि सरदार सरोवर प्रकल्पाचे बॅक वॉटर या नदी पत्रात मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

विद्यार्थी करतात होळीचा वापर

विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी किंवा लोकांना बाजारहाटसाठी होडीचाच वापर करावा लागतो. चिमलखेडी, मणिबेली, भादल, बामणी, बिलगाव आदी गावातील बाहेरील जगाशी संपर्क ठेवण्यासाठी आजही दुर्गम भागातील बाधित संघर्ष करतांना चित्र बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

SCROLL FOR NEXT