Nandurbar maternal mortality: Saamtv
महाराष्ट्र

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यात मातामृत्यूची समस्या गडद; ११ महिन्यात तब्बल ८१५ महिलांनी केला गर्भपात

Nandurbar maternal mortality: योग्य तो पोषण आणि जागृती नसल्याने गेल्या ११ महिन्यात जिल्ह्यात ८१५ महिलांनी गर्भपात करवून घेतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Gangappa Pujari

सागर निकवाडे, नंदुरबार|ता. २९ मार्च २०२४

Nandurbar News:

नंदुरबार जिल्ह्यात मातामृत्यूची समस्या दिवसेंदिवस गडद होत आहे. जिल्ह्यामध्ये ११ महिन्यात तब्बल ८१५ महिलांनी गर्भपात करवून घेतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महिलांना आरोग्याबाबत जगजागृती करणे गरजेचे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मातामृत्यूची समस्या दिवसेंदिवस गडद होत आहे. यात महिलांच्या आरोग्याविषयीची अनास्था आणखी पुढे येत आहे. या अनास्थेतून योग्य तो पोषण आणि जागृती नसल्याने गेल्या ११ महिन्यात जिल्ह्यात ८१५ महिलांनी गर्भपात करवून घेतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या गर्भपाताची कारणे वेगवेगळी असली तरी बहुतांश महिलांना आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने गर्भपातांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात ७ शासकीय तर ३० खासगी दवाखान्यांमध्ये कायदेशीर पद्धतीने गर्भपात करण्यात येतात. २१ आठवड्यांपर्यंतच्या या गर्भपातांसाठी संबधित डॉक्टरांकडून परवानगी घेऊनच पुढील प्रक्रिया होते.

जिल्ह्यात गेल्या काही काळात १ हजार मुलींमागे ९७८ मुलींचा जन्म होत असल्याने स्त्री- पुरुष लिंगगुणोत्तर हे चांगल्या स्थितीत आहे. परंतु मातांच्या आरोग्याबाबत योग्य ती माहिती दिली जात नसल्याने गर्भधारणेनंतर वाढत जाणाऱ्या अडचणीतून गर्भपात होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे शासनाने गांभीर्याने याची दखल घेऊन जनजागृती करणे गरजेचे आहे.

.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khan Sir Viral Video: एक दोन नव्हे तर तब्बल १५००० विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या; खान सरांचा हात पाहून अवाक व्हाल

ICICI बँकेचा ग्राहकांना जबर दणका, अर्धा लाख रूपये मिनिमम बॅलेन्स ठेवावा लागणार

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरणार, शिंदेंसेनेची उद्या नाशिकमध्ये बैठक

Crime: बीडमध्ये रक्तरंजित थरार, नशेखोर तरुणाचा कुटुंबीयांवर चाकूहल्ला; आजीचा मृत्यू, आई-वडील गंभीर

Jitendra Awhad: 'बिहार,महाराष्ट्राच्या मतदार याद्या गायब'; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT