Jal Jeevan Mission Saam tv
महाराष्ट्र

Jal Jeevan Mission : जलजीवन मिशन दीड वर्षांपासून रखडले; कोट्यवधीचा खर्च करूनही आदिवासींचे हाल, पाण्यासाठी दोन किमीची पायपीट

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी; या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमित असून या योजना यशस्वी होणार नाहीत, अशी स्थिती आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यभर जलजीवन मिशन या कामांचा शुभारंभ केला. (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात जलजीवनच्या कामांच्या उद्घाटनाला दीड वर्षाचा कालावधी उलटला असला तरी ग्रामीण भागातील जलजीवन मिशनचे काम अजूनही अपूर्णच आहे. परिणामी आदिवासी भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. (Latest Marathi News)

नंदुरबारच्या नवापूर (Navapur) तालुक्यातील खोलविहिर, वांझळे गावात व आमसरपाडा गावात या गावांमध्ये दीड वर्षांपूर्वी ठेकेदारामार्फत जल जीवन अंतर्गत स्वच्छ पिण्याचे पाण्यासाठी कामाला सुरुवात झाली होती. मात्र ठेकेदार उद्घाटन करून दीड वर्षापासून फरार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर हंडा डोक्यावर ठेवून पायपीट करावी लागत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदुरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी; या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमित असून या योजना यशस्वी होणार नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे सरकारचा पैसाही वाया जाण्याची भीती लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले आहे. तर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सर्वच कामांचा आढावा घेण्यात येऊन ज्या ठिकाणी कामांमध्ये अनियमीतता आणि भ्रष्टाचार आढळून येईल, त्या ठिकाणी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

SCROLL FOR NEXT