सागर निकवाडे
नंदूरबार : जिल्ह्यातील आदिवासींचे पाहिजे तसा विकास झाला नाही. यामुळे २०१४ ला जिल्ह्यातील मतदारांनी (BJP) भाजपाला मतदान केले. यामुळे मागील ४० वर्ष राज करणाऱ्यांनी आता आदिवासींच्या (Nandurbar) न्यायसाठीच्या गप्पा मारू नये; असा टोला खासदार डॉ. हिना गावित यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना लगावला आहे. (Maharashtra News)
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा आज नंदुरबार जिल्ह्यात होणार आहे. या भारत जोडो न्याय यात्रेकडे जिल्ह्यातील नागरिकांनी पाठ फिरवली असल्याचा आरोप खासदार डॉ. हिना गावित (Hina Gavit) यांनी केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांनी काँग्रेस पक्षाला (Congress) ४० वर्षपर्यंत मत देऊन सत्तेत आणले. मात्र त्यांचा हवा तसा विकास केला नसल्याचा आरोप देखील खासदार गावित यांनी केला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
महायुतीच्या राज्यात ४५ प्लस जागा
राज्यात असलेल्या महायुतीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला ४५ प्लस येणार असल्याचे विश्वास भाजप राष्ट्रीय प्रवक्त्या तथा खासदार डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.