Prakasha Barrage Saam tv
महाराष्ट्र

प्रकाशा बॅरेजचे दरवाजे बंद होताच मच्छीमारांची झुंबड

प्रकाशा बॅरेजचे दरवाजे बंद होताच मच्छीमारांची झुंबड

दिनू गावित

नंदुरबार : मागील महिनाभरात अधून मधून पाऊस सुरूच आहे. यामुळे तापी नदीला पुर कायम राहिला. यात नंदुरबार (Nandurbar) जिल्‍ह्यातील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडे होते. परंतु, आता ते बंद झाले असल्‍याने (Prakasha) प्रकाशा बॅरेजच्‍या पुढे पुर ओसरला आहे. यामुळे आता मच्‍छीमारांची गर्दी झालेली पहावयास मिळत आहे. (Nandurbar News Prakasha Barage)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील हतनूर धरणातून (Hatnur Dam) सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नंदुरबार जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीवरील (Sarangkheda Barrage) सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे गत १५ दिवसांपासून उघडण्यात आले होते. प्रकाशा येथील चार दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले गेल्याने पाणी बाहेर पडत होते. दरम्यान पाऊस कमी झाल्याने आणि हतनूर धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्याने बॅरेज प्रकल्पांना दरवाजे बंद करण्याचे आदेश देण्यात आले. हे दरवाजे बंद झाल्यानंतर काही वेळात नदी पात्रात मच्छीमार बांधवांची अशी झुंबड उडाली होती.

एकाचवेळी अनेक जाळे

नदीपात्रात मोठ्या संख्येने मासे मिळण्याची शक्यता असल्याने एकाचवेळी अनेक जण जाळं घेत पाण्यात उतरले होते. यातून प्रकाशा पुलावरुन नदीपात्रात मच्छीमारांची शाळाच भरल्याचे दिसून आले. यातून अनेक मच्छीमारांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

SCROLL FOR NEXT