Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: चारशे कोटी रुपयांचा प्रकल्प दोन महिन्‍यांपासून बंद; ६० हजाराचे बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित

चारशे कोटी रुपयांचा प्रकल्प दोन महिन्‍यांपासून बंद; ६० हजाजाचे बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीवर दोन बॅरेजचा तयार करण्यात आले आहेत. या बॅरिजेसमुळे सिंचनाची मोठी सोय झाली असून, यामुळे (Nandurbar) शेती पिकांना आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठा फायदा आहे. मात्र या प्रकल्पाकडे संबंधित विभागाच्या दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी गेल्या (Tapi River) दोन महिन्यापासून वीज पुरवठा तांत्रिक अडचणीमुळे खंडीत झाला आहे. तर इथे सुरक्षारक्षक देखील नसतो. (Live Marathi News)

तापी नदीवर प्रकल्पासाठी चारशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या आहे. परंतु हा प्रकल्प नेमकं कशासाठी? असाच काहीसा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तापी नदीचे पाणी महाराष्ट्राच्या वाटेला १३ TMC एवढं आहे. मात्र संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा गुजरात राज्यात जात आहे. तर गेल्या दोन महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही. सीसीटीव्ही बंद पडले आहेत, असे अनेक समस्या समोर येत आहेत.

प्रकल्पाच्या 60 हजार रुपये बिल थकीत आहे. दोन महिन्यापासून वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. तर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी देखील वेळ नाही. ऐन उन्हाळ्याच्या वेळेस पाण्याच्या समस्या उद्भवली तर पाणी कुठून कसं येणार असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा; अशी मागणी आता केली जात आहे. या विषयावर कुठल्या अधिकारी बोलण्यास तयार होत नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT