सागर निकवाडे
नंदुरबार : पावसाळा संपत आला तरी नंदुरबार जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) नंदुरबार, शहादा व नवापूर तालुक्यात ३० टक्के पावसाची तूट आहे. यामुळे सर्वच लघु प्रकल्पांमध्ये (Rain) पाण्याच्या ठणठणात असून पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात अवघा ४१ टक्के पाणीसाठा आहे. (Latest Marathi News)
पावसाळ्याचे चार महिने संपले असले तरी जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर आणि शहादा तालुक्यात पावसाची तूट कायम आहे. तिघी (Navapur) तालुक्यांमध्ये सरासरी ३० ते ३५ टक्के पावसाची तूट असल्याचे चित्र आहे. यावर्षीचा सर्वात कमी पाऊस शहादा तालुक्यात झाला असून पावसाचे प्रमाण ६५ टक्के इतकी आहे. नवापूर तालुक्यात ६८ टक्के तर नंदुरबार तालुक्यात ६९ टक्के पाऊस झाला आहे. पावसाची तूट आणि पावसाचा मोठा खंड यामुळे या तिन्ही तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
दुष्काळी परिस्थिती
तिन्ही तालुक्यातील ११ महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती असून या मंडळातील लघु तलाव आणि लघु बंधाऱ्यांमध्ये पाण्याच्या ठणठणात आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात अवघा ४१ टक्के पाणीसाठा असून परतीच्या पावसावर सर्वांच्या नजरा लागून आहेत. जिल्ह्यातील पावसाचे तूट लक्षात घेता या तिघे तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा; अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून सरकार कशाची वाट पाहत आहे असा सवालही आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.