nana patole 
महाराष्ट्र

भाजपाची 'ही' प्रवृत्ती लाेकशाहीला घातक : नाना पटाेले

उमेदवार बदलणे ही आमची स्ट्रटजी होती.

साम न्यूज नेटवर्क

- मंगेश माेहिते

नागपूर : भारतीय जनता पक्षास (bjp) स्वतःच्या उमेदवारांवर विश्वास नव्हता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत माेठ्या प्रमाणात घाेडेबाजार झाल्याचे आपणांस पहायला मिळाले आहे. दरम्यान उमेदवार बदलल्याने आम्हांला काही फरक पडला नाही असे काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले (nana patole) यांनी विदर्भातील विधान परिषदांच्या निवडणुकीच्या निकालावर नागपूर (nagpur) येथे भाष्य केले. maharashtra mlc election update

नाना पटाेले म्हणाले भाजपने घोडेबाजार करून हा विजय मिळविला आहे. घोडेबाजार होणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. स्वतःचे मतदार त्यांनी बाहेर नेले. त्यांचा आपल्या मतदारांवर विश्वास नव्हता. त्यामुळेच पर्यटनावारी करावी लागली. असाे. जाे निकाल आला त्याचे स्वागतच करायला पाहिजे.

चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी तुम्ही राजीनामा द्यावा असे म्हटले आहे. यावर नाना पटाेले म्हणाले त्यावर आत्ता बाेलणे उचित ठरणार नाही. याचे उत्तर जररु नंतर दिले जाईल. दरम्यान उमेदवार बदलणे ही आमची स्ट्रटजी होती. त्याचा आमच्या उमेदवारावर काहीही परिणाम झाला नाही असे पटाेले यांनी स्पष्ट केले.

मला माहित नाही

दरम्यान अकाेलामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. यावर नाना पटाेले यांनी त्याबाबतची मला माहिती नाही असे नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT