Nagpur Police recruitment scam  संजय डाफ
महाराष्ट्र

Nagpur: पोलीस भरतीत घोटाळा; लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीत बोगस उमेदवार

2021 अखेरच्या तीन महिन्यात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या परीक्षेत उमेदवारांकडून 12 ते 15 लाख रुपये घेण्यात आले. ज्यांनी पैसे दिले त्यांच्या लेखी आणि शारीरिक परीक्षेला वेगळ्याच उमेदवाराने बसविण्यात आल्याचा प्रकार उघसकीस आला आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - पोलीस भरती मध्ये घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. हे तिघंही औरंगाबाद (Aurangabad) येथील आहेत. त्यामुळे पोलीस भरती (Police Recruitment ) घोटाळ्यात औरंगाबाद कनेक्शन असल्याचं पुढे आलं आहे. 2021 अखेरच्या तीन महिन्यात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या परीक्षेत उमेदवारांकडून 12 ते 15 लाख रुपये घेण्यात आले. ज्यांनी पैसे दिले त्यांच्या लेखी आणि शारीरिक परीक्षेला वेगळ्याच उमेदवाराने बसविण्यात आल्याचा प्रकार उघसकीस आला आहे. ही टोळी उमेदवाराला पास करून देण्यासाठी बोगस उमेदवाराचा (Fraud Candidate) वापर करत होती. (Nagpur Police recruitment scam)

हे देखील पहा -

गुन्हे शाखेला याची कुणकुण लागल्यावर तपास सुरू झाला. तपासादरम्यान ही टोळी औरंगाबाद येथील असल्याची माहिती समोर आली आली आहे. या टोळीनं प्रत्येक्ष उमेदवारांना गाठून त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यामुळं या घोटाळ्यात औरंगाबाद कनेक्शन पुढं आलं आहे. राज्यातील इतर भागातही पोलीस भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्या असण्याची शक्यता असून यात बड्या अधिकाऱ्यांचा समावेश असू शकतो. पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT