नागपूर - पावसाळा काही दिवसांवर आला आहे, अशा स्थितीत नागपूरमधील धोकादायक ईमारती रहिवाशांनी खाली न केल्यामुळे नागपूर (Nagpur) महानगरपालिका प्रशासनाचं टेन्शन वाढल आहे. नागपूर शहरात १७३ धोकादायक ईमारती आहेत. शहरातील गांधीबाग परिसरात सर्वाधिक धोकादायक ईमारती आहेत. या धोकादायक ईमारती खाली करण्यासाठी नागपूर मनपा प्रशासनाने वारंवार नोटीस बजावले, मात्र तरिही या धोकादायक ईमारतीत लोक राहतात. त्यामुळे पावसाळ्यात इथे राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला.
हे देखील पाहा -
नागपूर महानगरपालिकेच्या झोन कार्यालयांनी ३०० जीर्ण ईमारतींपैकी १७३ ईमारती जास्त धोकादायक असल्याचं सांगीतलं जात आहे. तब्बल ९७ ईमारती राहण्यास योग्य नाही, तरिही लोक धोका पत्करुन या ईमारतीत राहत आहेत. मनपाच्या नोटीसीला न जुमानता लोक या धोकादायक ईमारतीत राहत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.