हेडफोनच्या वादातून युवतीची हत्या ! जयेश गावंडे
महाराष्ट्र

हेडफोनच्या वादातून युवतीची हत्या !

अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गौरक्षण रोड परिसरात हेडफोनच्या वादातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जयेश गावंडे

अकोला - अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गौरक्षण रोड परिसरात हेडफोनच्या वादातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माधवनगर येथील रहिवासी असलेल्या एका 20 वर्षीय आतेबहिणीची तिच्याच मामेभावाने हेडफोन न दिल्याच्या कारणावरून पोटात धारदार चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. Murder of girl due to headphones!

हे देखील पहा -

या हत्याकांडातील आरोपीस खदान पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या हत्येचे नेमके कारण काय आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. माधवनगर येथील रहिवासी नेहा नंदलाल यादव व तिचाच मामेभाऊ ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव हे शेजारी शेजारी राहतात. आज सायंकाळी हे दोघेही घरी असताना त्यांच्यात मोबाइलच्या हेडफोनवरून वाद सुरू झाला.

या वादात ऋषिकेश उर्फ बॉबीने संतापात येत आतेबहीण नेहाच्या पोटात धारदार चाकूने वार केले. यामध्ये गंभीररीत्या जखमी नेहाचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान उत्तरीय तपासणीसाठी नेहाला अकोल्यातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त केले आहे. या घनतेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. नेमकी घटना का घडली याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT