आता मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई ते नागपूर प्रवास आता अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे. लवकरच या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार असून, जिथे सध्या एक्स्प्रेस ट्रेनने प्रवासासाठी १४ ते २० तास लागतात, ते अंतर वंदे भारतने केवळ ९ तासांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळपास ५ ते ६ तासांची मोठी बचत होणार आहे.
मुंबई-नागपूर मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे तयार झालेली ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी मजबूत करणार आहे. यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास काही तासात पूर्ण होणार आहे.
मार्ग आणि अंतर
नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे अंतर ८३७ इतके आहे. मुंबईहून नागपूरला पोहोचण्यासाठी साधारण १५ ते २० तास लागतात. मात्र, हे अंतर आता नऊ तासांत पूर्ण करता येणार आहे. वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांची ५ ते ६ तासांच्या वेळेची बचत होणार आहे.
प्रमुख थांबे
प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेन खालील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल:
वर्धा जंक्शन
बडनेरा जंक्शन
अकोला जंक्शन
भुसावळ जंक्शन
जळगाव जंक्शन
नाशिक रोड
दादर
हे थांबे लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
कोच रचना
१ एक्झिक्युटिव्ह एसी कोच
७ एसी चेअर कार कोच
या कोचमध्ये प्रवाशांना आधुनिक सुविधा आणि अत्यंत आरामदायी वातावरणाचा अनुभव मिळेल, ज्यामुळे प्रवास अधिक आनंददायी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.