गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांना प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचे विघ्न कोकणवासियांसमोर आलंय. रायगडमधील इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 5 ते 6 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी पाऊण ते एक तास लागताहेत. महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावलाय. खड्डे आणि अपूर्ण बाह्यवळण रस्त्यांमुळे कोकणवासियांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय...
तर दुसरीकडे, रस्ते वाहतुकीवरून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असताना रेल्वे वाहतूक प्रचंड विलंबाने सुरूय. कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं असून जबलपूर एक्सप्रेस तब्बल 11 ते 12 तास उशिरा दाखल झालीये. तर इतर गाड्याही दोन ते तीन तास विलंबाने धावत आहेत... यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांचा मोठा मनस्ताप होतोय...
पुणे, मुंबई, ठाणे परिसरातून मोठ्या संख्येने गणेशभक्त कोकणाच्या दिशेने रवाना झालेत. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांचे विघ्न यंदाही टळलेलं नाहीये. त्यामुळे कोकणवासियांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. विशेष म्हणजे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी नुकतीच महामार्गाच्या कामाच्या दिरंगाईबद्दल जाहीर खंत व्यक्त केली होती. दीड दशकापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील कामाचं विघ्न कधी दूर होणार?... हाच खरा प्रश्न आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.