देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलंय - भाई जगताप
देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलंय - भाई जगताप  SaamTvNews
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलंय - भाई जगताप

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका निवडणूका जवळ येत असताना, काँग्रेस पक्षातर्फे आज उल्हासनगर मध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यानी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींवर निशाणा साधत जोरदार टीका केली.

हे देखील पहा :

भाई जगताप म्हणाले, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी नुकतंच एक वक्तव्य केलं, कि मला वाटतं आजही मीच मुख्यमंत्री आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, हे दिसून येतंय. आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात राज्याची वाट लावणारा मुख्यमंत्री कोण झाला असेल तर ते फडणवीस आहेत असा शाब्दिक प्रहार जगतापांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, फडणवीसांनी कधीच महाराष्ट्र आणि मुंबई साठी काही केले नाही. मोदींना खुश करण्यासाठी महाराष्ट्र मधील फायनांशियल सेंटर गुजरात मध्ये पाठवलं. नितीन गडकरी मोठं मोठ्या गोष्टी करतात. मात्र, जेएनपीटी मधील महत्वाचा भाग असणारे ट्रान्सपोर्टेशन गुजरात मध्ये पाठवण्यात आलं. तर, जनआशीर्वाद यात्रा काढण्याचा मोठा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला. मात्र, त्यांना जनतेने पळवून लावलं असून फडणवीस यांच्या डोक्यावर मोठा परिणाम झाला आहे, अशी टीका भाई जगताप यांनी केली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dr. Anjali Nimbalkar : डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रचारातही निभावली ड्यूटी ; अपघातातील जखमीला उपचार करत स्वतः घातले टाके

Shivani Narayanan: बॉलीवूडच्या नटीही भरतील पाणी, फक्त सुंदर नाही भारी दिसते साऊथची 'शिवानी'

Grapes Juice : द्राक्षाचा ज्युस प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Badam Oil : स्कीन केअरसाठी बदाम तेलाचे ६ आश्चर्यकारक फायदे

Mumbai News: मुंबईत चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT