देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलंय - भाई जगताप  SaamTvNews
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलंय - भाई जगताप

भाई जगताप म्हणाले, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी नुकतंच एक वक्तव्य केलं, कि मला वाटतं आजही मीच मुख्यमंत्री आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, हे दिसून येतंय.

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका निवडणूका जवळ येत असताना, काँग्रेस पक्षातर्फे आज उल्हासनगर मध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यानी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींवर निशाणा साधत जोरदार टीका केली.

हे देखील पहा :

भाई जगताप म्हणाले, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी नुकतंच एक वक्तव्य केलं, कि मला वाटतं आजही मीच मुख्यमंत्री आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, हे दिसून येतंय. आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात राज्याची वाट लावणारा मुख्यमंत्री कोण झाला असेल तर ते फडणवीस आहेत असा शाब्दिक प्रहार जगतापांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, फडणवीसांनी कधीच महाराष्ट्र आणि मुंबई साठी काही केले नाही. मोदींना खुश करण्यासाठी महाराष्ट्र मधील फायनांशियल सेंटर गुजरात मध्ये पाठवलं. नितीन गडकरी मोठं मोठ्या गोष्टी करतात. मात्र, जेएनपीटी मधील महत्वाचा भाग असणारे ट्रान्सपोर्टेशन गुजरात मध्ये पाठवण्यात आलं. तर, जनआशीर्वाद यात्रा काढण्याचा मोठा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला. मात्र, त्यांना जनतेने पळवून लावलं असून फडणवीस यांच्या डोक्यावर मोठा परिणाम झाला आहे, अशी टीका भाई जगताप यांनी केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT